Share Market Crash in Marathi | सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी चढ-उतार चालू आहे. २०२५ च्या फेब्रुवारीमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी सारख्या निर्देशांकांमध्ये १०% पेक्षा जास्त घसरण झाली आहे.
ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ “रेड” दिसून येत आहे. अशा वेळी लोक घाबरतात आणि सगळी गुंतवणूक विकून टाकण्याचा विचार करतात.
पण खरा तोटा म्हणजे काय? आणि तो कधी होतो? हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊ या.
“कागदी तोटा” vs “खरा तोटा”: फरक समजणे
समजा, तुम्ही २ वर्षांपासून SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मार्गे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. आज तुमची एकूण गुंतवणूक २ लाख रुपये आहे.
बाजारात १५% घसरण झाल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ १.७ लाख रुपयांवर आला आहे. यालाच “कागदी तोटा” म्हणतात. हा तोटा तेव्हाच “खरा” होतो जेव्हा तुम्ही घाबरून हे युनिट्स कमी भावात विकता.
पण, जर तुम्ही गुंतवणूक विकली नाही आणि शेअर बाजार ५ महिन्यांनी परत वर आला, तर हा तोटा आपोआप भरून निघतो.
इतिहासातील धडे: बाजार नेहमी परत वर आला आहे
२००८ चा आर्थिक संकट, कोविड क्रॅश (२०२०), किंवा हर्षद मेहता आणि केतन पारेख घोटाळे यांसारख्या घटनांनंतरही बाजाराने पुन्हा उच्चांक गाठला आहे.
उदाहरणार्थ, २०२० मध्ये कोविडमुळे सेन्सेक्स ३०% खाली आला, पण १ वर्षातच त्याने ८०% वर गेला.
अशा वेळी ज्यांनी गुंतवणूक विकली नाही, त्यांना दीर्घकाळात फायदा झाला. उलट, ज्यांनी “पॅनिक सेल” केले, त्यांना खरा तोटा सहन करावा लागला.
मोठ्या पोर्टफोलिओची कल्पना: शांत राहणे का गरजेचे?
आज तुमचा पोर्टफोलियो फक्त २ लाखाचा आहे आणि एवढी भीती वाटत आहे. मग उद्या पोर्टफोलियो मोठा होईल तेव्हा काय कराल?
समजा, तुमचे पोर्टफोलिओ २० लाख रुपयांचा आहे आणि १५% घसरणीमुळे तो १७ लाखावर आला आहे. यातून होणारा “कागदी तोटा” ३ लाख रुपयांचा आहे.
म्हणून अशा वेळी घाबरण्याऐवजी, विचार करा:
- SIP मधील “रुपयाची सरासरी किंमत” (Rupee Cost Averaging) चा फायदा: बाजार घसरल्यावर तुम्ही स्वस्त भावात अधिक युनिट्स खरेदी करता, ज्यामुळे दीर्घकाळात नफा वाढतो.
- बाजाराचा नैसर्गिक चक्र: चढ-उतार हा बाजाराचा भाग आहे. त्याला घाबरून न राहता, लॉजिकल निर्णय घेणे महत्त्वाचा आहे.
मग तुम्ही काय केल पाहिजे?
गुंतवणूक थांबवू नका: SIP थांबवल्यास, तुम्ही घसरणीत स्वस्त युनिट्स खरेदी करण्याची संधी गमवाल.
पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाई करा: इक्विटी, डेट फंड, सोने यांसारख्या विविध गुंतवणुकीमध्ये संतुलन राखा.
दीर्घकालीन दृष्टिकोन: ५-१० वर्षांच्या टाइम हॉरिझनसह गुंतवणूक केल्यास, बाजाराच्या चढ-उताराचा प्रभाव कमी होतो.
भावनांवर नियंत्रण ठेवा
बाजारातील रेड नंबर्स हे कायमस्वरूपी नसतात.
“खरा तोटा” तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही घाबरून गुंतवणूक मार्केटच्या तळाशी विकता.
इतिहास सांगतो की, प्रत्येक क्रॅशनंतर बाजाराने पुन्हा वाढ केली आहे. म्हणून, धीर ठेवा, लॉजिकली विचार करा, आणि गुंतवणूक सुरू ठेवा.
पोस्ट वाचा: Money Management | गुंतवणुकदारांच्या १० सुपरपॉवर्स – तुमच्याकडे कोणत्या आहेत?
पोस्ट वाचा: Mutual Fund SIP | एसआईपी बंद होण्यामध्ये वाढ, गुंतवणूकदारांमध्ये चिंता – कारणे?