Sensex Today: गेल्या आठवड्यात भारत–पाक सीमा तणावामुळे Nifty 50 च्या तीन आठवड्यांच्या वाढीच्या मालिकेला ब्रेक लागला होता. मात्र, अतिवेगवान परस्पर हवाई कारवाईनंतर आलेली शांतता आणि Q4 परिणामांतील जोरदार कामगिरी यांच्या जोरावर market rally पुन्हा सुरु झाली आहे. Nifty 50 मध्ये 2.5% वाढ, Sensex 2300 पॉईंट्सने वर पोहचला आहे.
1. सीमाशांततेमुळे आत्मविश्वास वाढला
- अतिवेगाने वाढलेले India-Pakistan tensions हळूहळू शांत होत असल्याने जोखीम कमी झाली.
- सीमारेषेवरील तणाव घटल्यामुळे पुन्हा market rally सुरू झाली आहे.
2. Q4 निकालांमध्ये वाढ
- आता पर्यन्त ४७२ कंपन्यांचे निकाल जाहीर झाले आहेत.
- 10% YoY profit growth, 21.35% margins कायम, जे पुढील तिमाहींसाठी बळकट संकेत आहेत.
- FY26 मध्ये 12% earnings growth अपेक्षा, ज्यामुळे Nifty 50 चे forward P/E at 18.4 राहील.
3. परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा आगमन
- मध्य एप्रिलपासून FPIs ने $5.8 बिलियनचा inflow; भारत emerging markets मध्ये अव्वल आहे.
- गेल्या आठवड्यात $326M net inflows; यापैकी $257M India-dedicated funds मध्ये आलेत.
- foreign inflows च्या या सातत्यामुळे बाजाराला दीर्घकालीन आधार मिळत आहे.
4. व्यापार करारांची शक्यता
- यूके, EU, आणि US सोबत Free Trade Agreement (FTA) होण्याची शक्यता वाढली; manufacturing, electronics, pharma, auto या क्षेत्रात गती आली आहे.
- defence stocks मध्ये देखील दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा इंट्रेस्ट वाढत आहे.
ही पोस्ट वाचा: Yes Bank च्या शेअर्समध्ये 9% वाढ, “या” कंपनीकडून ₹13,483 कोटींची गुंतवणूक